Thursday, November 8, 2018

आणि ... डॉ. काशिनाथ घाणेकर




बऱ्याच दिवसांनी एखादा मराठी चित्रपट थेटरात जाऊन बघितला. whatsapp च्या पोस्ट्स ला बळी पडून नव्हे. तर चित्रपटाच्या ट्रेलर ला भुलून.

एखाद्या कलावंताचं आयुष्य पडद्यावर आणणारा हा काही पहिला चित्रपट नाही आणि शेवटचा पण नसेल. पण हा चित्रपट लक्षात राहणारा मात्र नक्कीच आहे.
एका दंतवैद्याची नाट्यक्षेत्रात काम करण्यासाठीची धडपड दाखवत चित्रपट सुरु होतो. त्यानंतर मग कष्टानं मिळवलेलं यश, पण त्या यशाची चढलेली नशा, नाट्यक्षेत्रातले प्रतिस्पर्धी, मित्र, व्यक्तिगत जीवनातले चढउतार, अपयशाची परत एकदा भेट, लोकप्रियतेची लागलेली चटक, व्यसनाधीनता अशा कितीतरी वळणावळणाच्या वाटेवरून हा प्रवास पुढे पुढे सरकत राहतो. आणि महत्वाचं म्हणजे प्रेक्षक देखील तितकाच गुंतून जातो, प्रेक्षक त्या प्रवासाचा एक भाग नक्कीच बनून जातो.
त्यामुळंच जेव्हा काशिनाथच्या अभिनयासाठी चित्रपटात टाळ्या किंवा शिट्ट्या पडतात, तेव्हा त्या आपल्याला पण वाजवाव्याशा वाटतात, आणि काशिनाथ जेव्हा चुकीचं वागतो तेव्हा त्याचा तितकाच राग  देखील येतो, आणि हेच या चित्रपटाचं यश आहे. अर्थात त्या यशात सिंहाचा वाटा हा सुबोध भावेचा आहे, डॉक्टरांची भूमिका त्यानं खरंच जिवंत केली आहे. बाकीच्या अभिनेत्यांनी दिलेली साथ तितकीच मोलाची आहे, पण चित्रपटभर व्यापून राहणं आणि नंतरही उरणं म्हणजे काय ते सुबोधचा अभिनय बघून लक्षात येतं.

एका अर्थानं बघायला गेलं तर डॉ काशिनाथ घाणेकर हे मराठी नाट्यभूमीतले 'संजू' होते असं म्हणायला हरकत नाही. त्यांचं आयुष्य (आणि मृत्यूही) हे तितकंच नाट्यमय होतं, त्यात कष्ट, यश-अपयश, चढउतार, व्यसनं, प्रेम प्रकरणं असा सगळा मसाला खरं  तर ठासून भरला आहे. पण लेखक-दिग्दर्शकानं हा फक्त मसाला चित्रपट म्हणून मांडलेला नाही, तर एखादा कलावंत जेव्हा आपलं आयुष्य जगत असतो तेव्हा त्याला कोणकोणत्या पातळीवर संघर्ष करावा लागतो, आणि तो संघर्ष करणारा शेवटी तोहि एक माणूसच असतो हे दाखवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. कलावंतांच्या वैयक्तिक जीवनातले चढ उतार व्यावसायिक जीवनात कसे प्रभावी किंवा धोकादायी ठरू शकतात यावर देखील चित्रपट प्रकाश टाकतो.
एकंदरीतच अभिनय, लेखन, दिग्दर्शन, संवाद अशा सर्वच गोष्टींसाठी आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासातलं एक सोनेरी म्हणता येणार नाही, पण 'रसरसतं-धगधगतं' पान वाचण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघितला पाहिजे. 

Wednesday, January 3, 2018

Shubh Mangal Saavdhan - movie review

First things first!
Movies like Shubh Mangal Savdhan (SMS) should be made.
It's a good movie.
It's enjoyable and different from regular rom-com movies made in Hindi.
You need to be creative to comment on delicate subjects like erectile dysfunction, in a light-hearted and engaging way. The performances and writing have to be top-notch otherwise it will be a boring lecture for viewers. SMS delivers on all these fronts, story is good and nicely narrated, movie length is apt, performances are up to the mark (of EACH and EVERY actor/actress).

Having said that, you have to walk on the edge and shouldn't loose the track between entertainment and the message that you want to pass on, otherwise you would be very preachy or only masala movie. This is where the movie lacks and it does loose the track. There are some scenes where you don't believe what is happening, you feel this much exaggeration is not required. The movie bends more towards the entertainment in some scenes, although it does gather some laughs, viewers won't relate to such scenes.

But, overall if you look at the bigger picture or the message/s this movie is trying to pass on, you will forgive all such wrong detours the movie takes. So this movie should be definitely watched.

Monday, January 1, 2018

वर्तुळ


*******************
"आरं २-४ खिळे जास्तच पेरत जा लेका …. आपण ४ खिळे टाकले कि त्यातला एखाद-दुसरा कामाला येतो … नको तिथं आळस करत जाऊ नगो"… परश्या आपल्या पोराला सकाळी सकाळी दटावत होता.
"कालचा खिळा त्या गिऱ्हाईकान कुट टाकला काय कळना …. गावलाच न्हाई … आणि आजकाल राजूदादा पण खिळ्याच पैशे जास्त घेतूया …. नवीन खीळे आणणार तरी कुठनं?" सदा पण वैतागून उत्तरला…
"या धंद्यात काय बरकत न्हाय … आपली शेती बरी होती लेका, जाऊदे पण आता काय करणार … १० रुपये जास्तच लावू पंक्चर काढायचे"… असं म्हणून परश्यान दुकान उघडलं आणि उदबत्ती पेटवून देवाच्या तसबिरींना ओवाळायला सुरुवात केली.
सदानं त्यावर काही न बोलता पेपर उघडून वाचायला सुरुवात केली, तेवढ्यात कोणीतरी गिऱ्हाईक आलेलं दिसलं, 'चला पहिली भवानी तर झाली' म्हणून तो उठला आणि कामाला लागला…  
*******************
"जास्त वेळ बोलू शकणार नाही … आज डॉक्टर जरा घुश्श्यातच आहेत…. एवढ्यात कोणी पेशंट आला तर प्रोब्लेम होईल…  चल बाय नंतर बोलू" असं म्हणून मोहिनीने गडबडीने फोने ठेवून दिला.
तेवढ्यात तिच्या टेबलावरचा फोन वाजला, "हा डॉक्टर … हा ठीक आहे, हो चालेल. हा मी लक्षात ठेवून करेन सर. "
केसपेपरची किंमत १३० वरून अचानक १५० का केली डॉक्टरांनी याचा काही मोहिनीला उलगडा झाला नाही. तिने मात्र पडत्या फळाची आज्ञा मानून लक्षात राहण्यासाठी नवीन केसपेपरवर जास्तीची किंमत लिहून ठेवली. 
******************
"हे बघा, मला आजच आलेला अनुभव आहे … नुसते कानाला हात लावून बघायचे १५० रुपये घेतले डॉक्टरांनी … केसपेपरचे दीडशे वेगळे! कुठल्या जमान्यात आहे राव तुम्ही….  ३ किलोमीटर साठी १० नाही १५ रुपये लावत चला… " युनियन लीडर संग्राम आज भलत्याच जोशात आला होता.
"वाढत्या महागाईत वाहून जाल नाहीतर तुम्ही लोक सुध्दा …. हे बघा मतदानघेऊ, ज्यांना १५ रुपये रास्त वाटतात त्यांनी हात वर करा "
"व्हय …. महागाई कशी मारुतीच्या शेपटावाणी वाढतच चाललीया … " एरवी अबोल असणाऱ्या धोंडूनानांनी आज संग्रामची री ओढली आणि हात वर केला.
मतदान झालं, आणि संग्रामच्या अपेक्षेप्रमाणे दरवाढीचा प्रस्ताव अधिक करून रिक्षाचालकांनी उचलून धरला 
******************
"आज परत बटाटा? संपतोय का नाही त्यो?" दिवसभराच्या कामाला वैतागलेला परश्या बायकोवर खेकसला.
"आता तुमास्नी आणि काय सांगू, नेहमीची बाई जिच्याकडन भाजी घेते ती दर कमी करायलाच तयार नाई!  सगळ्या भाज्या अशाच २० आणि ३० रुपायला पावशेर …. परवडायचं कसं वो? आणि वर मलाच म्हणतीया कि बाई रिक्षाच भाडं बी डबल झालंया, मी भाजी जुन्या दरान कशी विकू?"
"मग काय बटाटा जास्त घेऊन आले परत!"
काय बोलावं काहीच न समजून, परश्याने नुसता हुंकार भरला आणि जेवायला सुरुवात केली. 
*****************
"एक चहा द्या मज आणुनी …. पिईन मी तो स्वप्राणाने "….  डॉक्टरांनी बूट काढता काढताच ओर्डर सोडली, "खूप वैताग आला राव आज… "
थोड्या वेळाने त्यांच्या पत्नीने चहा आणून दिला आणि विचारलं "का, काय झालं? पेशंट जास्त होते काय आज?"
"नाही फारसे नाहित… पण सकाळी निघालो आणि अर्ध्या वाटेत चाक पंक्चर झालं …स्टेपनीच चाक म्हणजे जुनंच होतं, ते पण पंक्चर झालं म्हणून काढून ठेवलेलं आणि त्याचं पंक्चर काढायचं राहून गेलं होतं…
दोन्ही चाकांच पंक्चर काढून घ्यावं म्हणून एका पंक्चर वाल्याकडे गेलो, तर त्याने दोन्हीचे मिळून दोनशे घेतले. बोटाएवढा खिळा निघाला चाकातून! त्यातच वेळ गेला बराच. "
"हं … आणि मोहिनी काय म्हणते … तिला काय सांगितलं? पगार वाढवून मागत होती ना ती?"
"होय …. दोन आठवड्यापासून विचारते आहे. वाढवतो एवढंच बोललो परवा तिला. नक्की आकडा ठरवला नाही अजून मी पण. "
अशा इकडच्या तिकडच्या गप्पा मारत चहा झाल्यावर डॉक्टरांनी विचारलं, "चिरंजीव कुठायत? किती वेळ खेळत असतोय हा?"
"आला आहे हो… समोरच्या आजोबांकडे गेलाय. त्याला शाळेत निबंधस्पर्धेसाठी एक निबंध लिहून हवाय मराठीमधून … त्यांच्याकडून मदत घेणार आहे. ते आजोबा मराठी मेडियम मधून शिकलेत ना!"
"मराठी मेडियम?? काहीही काय? माझंही मराठी चांगलंच आहे. मी पण मदत करू शकतो …. मला पण एक कागद, पेन आणून दे प्लीज!"
 पेन आणि वही आणून देताना "त्याचीच वही आहे … विषय लिहून ठेवलाय बघा त्याने ", असं सांगून बायको आपल्या कामाला निघून गेली. 
वहीच्या पानावर "महागाई आणि समाजाची बदलती मानसिकता" एवढंच लिहिलं होतं आणि पूर्ण पान कोरं होतं …. 
कितीतरी वेळ त्या मोकळ्या पानाकडे बघितल्यावर त्यांनी तिथे हातानेच एक वर्तुळ काढलं …. आणि वही बंद करून टाकली.